Wednesday 12 December 2018

ऋतू


तळपत्या उन्हातल्या पिवळट पानांना विचारलं,
बाबांनो तुमचं वय किती, काही सांगता येईल का ?
एकसाथ सगळी पानं देठापासून कसनुशी हसली
त्यातलंच एक पिकलं पान थरथरत म्हणालं,
ऋतू बेभरवशाचे झाल्यापासून 
कैक मौसम नवी घरटी झालीच नाहीत,
ज्या फांद्यांवर पक्षीच आले नाहीत 
तिथं पानांनी दिवस मोजण्यात हशील तरी काय ?

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...