गंधवेड्या वाऱ्याचं भान मग हरपत असतं
इथे आधीच आठवणींचे अत्तर छळतेय
जुन्या जखमांचं दुःख नव्याने उमगत राहतं
भीतीने मिटू नकोस डोळे
ओठांवर ओठ टेकवल्याने कुणी मरत नसतं....
नजरेनेही जखमा होतात
जेंव्हा कुणी बघून न बघितल्यासारखं करत असतं....
पदराआड लपवू नकोस चेहरा
फारतर बोलणं खुंटेल, अबोल नातं मरत नसतं ...
तुझं हे असं तर माझी वेगळीच तऱ्हा
चेहऱ्यावरून तुझ्या, नजर हटू नये असंच वाटत असतं...