पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर
त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ?
तुला भेटलो त्या वळणावरचे चिरे भग्न झाले
पण स्पर्श तुझा अजुनी झिळमिळतो पत्थरांवर
त्या स्पर्शप्रेमापायी तर, पाऊस कोसळत नसेल ना ?
तू जाताच तुझ्या घरातले चैतन्य निघून गेले
पण आठवणींचा मोगरा अजुनी फुलतो वेलीवर
त्या स्मृतीगंधापायी तर, वाऱ्याला गहिवरत नसेल ना ?
अनिमिष चराचर दिक्कालासह गोठून गेले
पण फुलपाखरं भिरभिरतात अजुनी सुकलेल्या फुलांवर
त्या विरहखुणापायी पंखावर त्यांच्या, नक्षी उमटत नसेल ना ?
- समीर गायकवाड.
https://kavitasameeer.blogspot.com/2019/06/blog-post_13.html
खासच
ReplyDelete