Friday, 21 December 2018

कढ


अडचणी बऱ्याचदा आल्या, संकटे आली

दरवेळी त्यानं तिच्याकडं आर्त पाहिलं

अंतरंगी तुफान असूनही ती अबोल राहिली 

जवळ बसून तिने, हातावर त्याच्या हात हळुवार ठेवला

तितकं पुरेसं होतं..  

स्पर्शानं वासना जशा जागतात

त्याहून अधिक दुःखांचे कढही निवतात

दृढ होत गेलेल्या सहवासाचा असाही अमीट ठसा असतो !


- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

लिलीची फुलं..

निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही, अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?' इतका वेळ खाली नजर खिळवून असले...