Friday, 21 December 2018

कढ


अडचणी बऱ्याचदा आल्या, संकटे आली

दरवेळी त्यानं तिच्याकडं आर्त पाहिलं

अंतरंगी तुफान असूनही ती अबोल राहिली 

जवळ बसून तिने, हातावर त्याच्या हात हळुवार ठेवला

तितकं पुरेसं होतं..  

स्पर्शानं वासना जशा जागतात

त्याहून अधिक दुःखांचे कढही निवतात

दृढ होत गेलेल्या सहवासाचा असाही अमीट ठसा असतो !


- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...