मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं आणि बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय
आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय?
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!
तुम्ही जर कधी लढले असालच सत्यासाठी तर
पेटून उठेल तुमचे ही ईमान नक्कीच
आणि असेल थोडी जरी श्रद्धा मानवतेवर तर विवेक ही जागेल तुमचा
पण मित्र हो,
तोवर निदान हात तरी कलम करून देऊ नकात त्यांना
अन्यथा ते तुमच्याच हातांनी तुमच्यावर शस्त्रे चालवतील
आणि मग यथावकाश होईल घोषणा - "तुम्ही शहिद झालात राष्ट्रासाठी!"
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment