Saturday, 23 March 2019

जाताना सांगून तो गेला होता...


जाताना सांगून तो गेला होता, "आता लवकरच मी परतेन घरी
वचन तुला दिलेलं अधूरं राहिलं तरी भारतमातेचं वचन मात्र पुरं करेन" 

वचन मला दिलेलंही त्याने पुरं केलंय, तो खरेच लवकर घरी आलाय
पूर्वी गणवेशात घरी यायचा, यावेळी तिरंग्यात लपेटून आलाय.

त्याचं मुखकमल पाहून हरखलेली माय म्हणतेय, हिरा माझा कसा निजलाय
त्याला छातीशी आपल्या गच्च धरून वृद्ध पित्याने मात्र हंबरडाच फोडलाय 

जिचा तो सौभाग्य अलंकार होता तिचा साजशृंगार कधीच गळून पडलाय
तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा हा एकच ध्रुवतारा होता जो निखळलाय

कसे सांगू मी तुम्हाला, "की सरहद्दीहून कुणाची माती आली आहे ?
हा अन्य कुणी नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा, हा मोठा बंधू आहे ! "...

हा तुकडा काळजाचा असा अवचित कसा गळून झडलाय

सहवेदनेसाठी जमलेला भावूक जत्था अल्पजीवी आहे, उद्याचा सवाल पडलाय..     

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...