जाताना
सांगून तो गेला होता,
"आता लवकरच मी परतेन घरी
वचन तुला दिलेलं अधूरं राहिलं तरी भारतमातेचं वचन मात्र पुरं करेन"
वचन मला दिलेलंही त्याने पुरं केलंय, तो खरेच लवकर
घरी आलाय
पूर्वी गणवेशात घरी यायचा, यावेळी तिरंग्यात लपेटून
आलाय.
त्याचं मुखकमल पाहून हरखलेली माय म्हणतेय, हिरा
माझा कसा निजलाय
त्याला छातीशी आपल्या गच्च धरून वृद्ध पित्याने मात्र हंबरडाच फोडलाय
जिचा तो सौभाग्य अलंकार होता तिचा साजशृंगार कधीच गळून पडलाय
तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा हा एकच ध्रुवतारा होता जो निखळलाय
कसे सांगू मी तुम्हाला, "की सरहद्दीहून कुणाची
माती आली आहे ?
हा अन्य कुणी नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा,
हा मोठा बंधू आहे ! "...
हा तुकडा काळजाचा असा अवचित कसा गळून झडलाय
Saturday, 23 March 2019
जाताना सांगून तो गेला होता...
Subscribe to:
Post Comments (Atom)
अंतिम स्मृती..
कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...

No comments:
Post a Comment