कालच ती भेटली.
तेंव्हा तिला सांगितलं,
तुझ्या बंदिस्त घराभोवती चौदिशेने कुंपण बांधताना
किमान त्यास तरी एक दरवाजा ठेव
एखाद्या दिवशी तुला
जगाची गरज नक्कीच भासेल.....
माझ्या मात्र दशदिशांनाही कुठेच दरवाजे नाहीत
की खिडक्या नाहीत.
जीव गुदमरवणारी सर्वव्यापी रेंगाळणारी निर्वात पोकळी फक्त आहे.
माझ्यासाठी कुणी दारं उघडी ठेवली असती
तर मी इथे असलो नसतो.
कबरीवरून काल माझ्या ती हळुवार हात फिरवून गेली तेंव्हा
तिच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू होते
काही हुंदके आणि कढ ठेवून ती गेली.
आता माझ्या भवताली आठवणींच्या सदाबहार पाकळ्या भिरभिरताहेत....
- समीर गायकवाड
Subscribe to:
Post Comments (Atom)
अंतिम स्मृती..
कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...
No comments:
Post a Comment