कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत
तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील
स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय
त्यांची खूप मदत झालीय, त्यांचे ऋण मानले पाहिजे
अगणित स्मृती आहेत
आस्ते कदम एकेक आठवण विरत जाईल
साऱ्या स्मृती हळूहळू लोप पावतील
त्यावेळी माझी फक्त एकच इच्छा असेल
अखेरच्या श्वासापर्यंत एकतरी स्मृती सचेत असावी
सर्वात शेवटी पुसली जाणारी आठवण ती असावी,
ज्या क्षणी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो...
- समीर गायकवाड
Subscribe to:
Post Comments (Atom)
लेखणीच्या लक्ष जिभांनी
रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी आभाळ विकायला काढले तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...
No comments:
Post a Comment