Tuesday, 6 November 2018

काजळ


उगीच संध्याकाळ होते
ती येणार नाही हे माहित असूनही
फिरून फिरून तिचीच आठवण घेऊन परतते
मनाच्या भिजलेल्या उंबरठयावर थबकते.
मनाचं दार उघडलं नाही तरी या आठवणी हटत नाहीत.
हळूहळू संधीप्रकाश विरत जातो आणि
अंधार तिच्या डोळ्यातलं काजळ घरभरात प्रसवत राहतो
मग तिला अनुभवता येतं !

आताशा मी तिची आठवणच काढत नाही,
बस्स सांज व्हायची वाट पाहतो...

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...