Wednesday 24 April 2019

मयूरपंखी

थोडंसं तारवटलेलं आभाळ काय आलंय, 
गवताच्या पिवळटलेल्या मलूल पात्यांनी माना वर केल्यात ! 
दिगंतापाशी वारयाने पाठ काय टेकलीय, 
सुकल्या पानांनी पानगळीच्या वाटा बदलल्यात.
अस्मान घनगर्द काय झालंय, 
घरट्याकडं चोचीत काड्या घेऊन सुगरणीच्या चकरा वाढल्यात. 
स्वस्थ मीनार कलते नभात दडले काय, 
काळजात मंदिराच्या कळसांच्या वेदना झंकारून आल्यात !
मेघांची घुम्या गर्दी काय झालीय, 
आसावल्या डोळ्यांत मायच्या आठवणी दाटून आल्यात. 
दूर रानात केकांचा आवाज काय आलाय, 
उदासवाण्या आसमंतास मयूरपंखी शब्दकळा पसरल्यात...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...