Wednesday, 24 April 2019

बहर

काळोख कापून आलोय तुझ्या दारी, हवे तर मला नकोस बिलगू 
काळजाताला माझ्या काढून घे चंद्र, उजळून उठेल तुझी हवेली 
गीत तुझ्या प्रकाशाचे लिहिण्यासाठी, गहाण टाकलीत बोटे कनवाळू 
तोरण दुसऱ्याचे बांध खुशाल, दुनिया कधीच मला विसरून गेली.
रडला निशिगंध जरी कर्दमल्या रात्रीस, नकोस त्याला चुरगाळू
सांग चुका माझ्या त्याला, स्वप्ने निरागस भुलून खंजिरास गेली
आली चुकून आठवण कधी माझी, तर नकोस छद्म अश्रुंचे ढाळू
प्राजक्तातच बहरतो मी, म्लानफुले त्याची चिरडून फुलत तू गेली....

- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

लिलीची फुलं..

निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही, अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?' इतका वेळ खाली नजर खिळवून असले...