Tuesday, 7 May 2019

अर्थ



वारच करायचे होते तर मूक रहावयाचे नव्हते
कोट छातीचा केला असता, स्मित ओठी झळकले असते !

घरच सोडायचे होते तर पत्ते दयावयाचे नव्हते
खेळ रस्त्यांचा केला असता, ठसे मनात उमटले असते !

चालच करायची होती तर कधी लपवावयाचे नव्हते
ताण डोळ्यांना दिला असता, बिंब मनात उतरले असते !

वचने मोडायचीच होती तर शब्द फुलवायचे नव्हते
छंद जीवाला लावला असता, मोल शपथेस राहिले असते !

धोकेच दयायचे होते तर स्वप्न रंगवावयाचे नव्हते 
खोट्या आशेवर जगलो असतो, अर्थ नात्यांना राहिले असते !

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...