Wednesday, 8 May 2019

नियत

हसतमुखाने फाळ म्हणाला मातीला, 
जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांना !
माती म्हणाली पावसाला, 
निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांना. 
पाऊस म्हणाला वाऱ्याला, 
नको बोलावूस मला आता अवकाळी फिरून भेटायला
वारं म्हणालं पावसाला, 
मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !
गदगदलेला फाळ म्हणाला, 
चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?
गोठ्यातल्या गायी वदल्या, 
माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ्यांला !

- समीर गायकवाड. 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...