Wednesday, 8 May 2019

उत्तर



आठवणींनी तुझ्या चिंबआसवात भिजल्या रात्री किती

सूर सतारीच्या काळजातलेआणिक जपायाचे तरी किती ?

 

तू गेलीस उधळूनी अल्वारखेळ अंतरीच्या भावनांचा

आठवणींची तुझ्या बकुळफुलेसांग वेचायची तरी किती ?

 

तू मांडलीस जगभरात आरासभग्न स्वप्नांची माझ्या

भासांनी तुझ्या बेचैन होतरात्री जागवायच्या तरी किती ?

 

तू रचुनी देखावा उत्कट प्रेमाचाकेलास तमाशा माझा 

नावाची तुझ्या अनिवारओढायची जपमाळ तरी किती ?

 

तू जाणलेस कधी न मोल शपथांचेघात वचनांनी केलास

काजळमायेत आणाभाकांच्याअजून गुंतायचे तरी किती ? 

 

उलगडले असतेस जरीअंतरंग मनीचे सहज तू कधी

मिळाले असते उत्तर मजलाआणिक जगायचे तरी किती ? 

No comments:

Post a Comment

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...