Wednesday, 8 May 2019

विवेक



आभाळाच्या निळाईखाली रांगतो डोंगर,
वाऱ्याच्या कुशीत झिम्मा खेळती पाखरं.

नदीच्या पाण्यात विरतो हवेतला गंध,
मातीच्या पोटात फुटे कंच हिरवा कोंब.

पिंपळाच्या बुंध्यावरती मुंगळ्यांची रांग,
पानाआडून किरणे मारी हवेत सुरंग.

गोठ्याच्या छपरात चालती किड्यांचे डाव,
बैलांच्या डोळ्यात दिसे काळजाचा ठाव.

नाही पिकलं धान्य तरी खुश हे गणगोत,
बीज सुकले तरी उरी असे आशेची ज्योत.

मातीच्या काळजात भेगाळले आभाळ,
धरित्रीच्या लेका तुझा तूच झालास रे काळ .

सांजेला पणती दिगंताच्या पायात,
विवेकाचा गर्भ उमलू दे उगवतीच्या उदरात !

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...