Wednesday, 8 May 2019

बाभळी




बारा गावच्या बाभळी आम्ही, जणू लंकेच्या पार्वती.
नाही सोन्याची आस ना मोत्याची भूक

मातीच्या नातलग आम्ही, लेतो निसर्गाचे लेणं.
साधीच माणसं आम्ही, आमचं साधंच जिणं.

नाही फुलांचे वेड, नसे दागिन्यांचा सोस
ना वाटे लाज सावळ्या रंगाची, नसे रुपाची खंत

बघा कधीही काळजात, तिथे खऱ्याचीच आस
पोट पाठ एक होऊनीही धरतो मातीचीच कास

माय बापाच्या घरी, आम्ही झालो परक्या
जणू वाऱ्यावर उडालेल्या शेवरीच्या गिरक्या

माहेर सासर दुईकडं आमच्या जीवाची घालमेल
आधी मुलगी मग बहीण, नंतर मायंची गं वेल !

कधी जगलोच नाही आम्ही आमचंच जिणं
दुःख जातसे पळून, आम्हाला सदा हसत पाहून

चंदनी देहातुनी आमच्या वाहे मायेचाच दरवळ
एक डाव येऊनि घ्या, आम्हा बाभळीचा हो आशीर्वाद.
नाही झालं प्रसन्न तुमचं मन, तर नाव दुजाचे लावीन…

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...