Wednesday 8 May 2019

रंग...


ऊन थोडंसं निष्प्रभ काय झालं, रंग फुलांचे फिके झाले  
येता राज्य उदास मेघांचे, घर सावलीने ही सोडले !
सोनं धुंद बहाव्याने उधळलं, पक्षी तरी ही न परतले
होताच दोनेक पाऊस, झाडांनी करार हिरवाईशी केले 
'यंदा उन्ह जरा जास्त होतं, हे आता नित्याचेच झाले'
असं म्हणत गवताच्या पात्यांनी, वसे तलवारीचे घेतले
रस्त्यातून थोडं पाणी वाहताच, भाव कागदी नावांना आले,
कलत्या दिवसापाशी आता झुरतात, उन्हाच्या कवडशांचे प्याले   
रंगला नच जरी पाऊस पुरता, तरी शब्दांनी साज ल्याले
रात्रीस गर्द आमराईच्या रानात, अंधारले आकाश लगडले
तुझ्या कमनीय आरस्पानी देहात, टिपूर चांदणे चमकले
एक ऋतू काय बदलला, रंग माझ्या कवितेने बदलले !!

- समीर गायकवाड      

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...