Tuesday, 7 May 2019

दिलासा


कोसावे का जगाला जेव्हा दगा सावल्यांनी दिला,
दोषावे का शस्त्राला, जेव्हा सुरा आपल्यांनी दिला ?

रडावे कसे आज मी जेव्हा पोबारा अश्रूंनी केला,
मिटावे का डोळ्यांनी, जेव्हा दगा पापण्यांनी दिला ?

शोधिता खुणां तेव्हा कळे डाव पावसाने साधला,
बोलावे का खुणांना, जेव्हा दगा आठवणींनी दिला ?

शोधू कसे गर्दीत तुला धीर अधीर नजरेने सोडला,
पांगावे का गर्दीने, जेव्हा सांगावा डोळ्यांनी दिला ?

गाव ओस झाले जेव्हा चितेस माझ्या अग्नी दिला,
विझवावे का चितेला, जेव्हा दिलासा ज्वालांनी दिला?

No comments:

Post a Comment

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...